Thursday 16 February 2012

शिवरायांना मनोरुग्ण ठरविणारी मानसिक विकृती

             शिवचरित्र आणि वाद हा विषय तसा महाराष्ट्राला नवीन नाही.नव्हे शिवरायान्विषयी वाद चालूच राहावा असेच काही जातीयवाद्यांना वाटत असते.शिवजयंती अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपली असताना काल  दि.१६.०२.२०१२ रोजी दैनिक दिव्य मराठी या वर्तमानपत्रात शिवरायांना मनोरुग्ण ठरविणारा  एक लेख छापून आला.राया उपासनी नावाच्या मूळच्या प्लोटिंगचा व्यवसाय करणाऱ्या जळगाव च्या या लेखकाने काल "उत्तम मानसोपचार तज्ञ समर्थ रामदास स्वामी " नावाचा एक अनैतिहासिक लेख दैनिक दिव्य मराठी या वर्तमानपत्रात छापून आणला.आजपर्यंत रामदासाला राष्ट्रगुरू  म्हणून मांडत असताना छत्रपती शिवरायांना त्यांचा शिष्योत्तम म्हणूनरंगविले जायचे परंतु या लेखात मात्र रामदासाला मानसोपचारतज्ञ म्हणून मांडताना शिवरायांना मनोरुग्ण,गर्विस्थ ठरविले गेले.याचा जाब जेव्हा या लेखकाला विचारला गेला तेव्हा मात्र तो म्हणाला कि माझ्या मुद्द्याचे खानदान करा,नुसता वाद घालू नका.मुळात मुद्दाच चुकीचा असल्यावर खानदान काय ढेकळचे करणार?
             
           कालच्या प्रकारानंतर राज्यभर प्रचंड संताप उसळला.हजारो शिवप्रेमींनी या विकृतीचा निषेध करत माफी मागण्याची विनंती संपादकाला आणि लेखकाला केली. शिप्रेमिंच्या भावना लक्षात घेत लेखक-संपादक द्वयीने उद्याच्या अंकात दिलगिरी व्यक्त करण्याचा शब्दही दिला.परंतु आजच्या दैनिक दिव्य मराठीच्या अंकात  लेखक-संपादक यांनी व्यक्त केलेली दिलगिरी वाचून "भीक नको पण कुत्रा अवर " अशीच म्हणण्याची वेळ शिव् प्रेमिंवर आली आहे.वाचकांच्या माहितीसाठी आजच्या दैनिक दिव्य मराठी मधील छापून आलेली दिलगिरी देतो." दैनिक दिव्या मराठीच्या १६ फेब्रुवारीच्या अंकात धर्म-दर्शन या पानावर माझा  उत्तम मानसोपचारतज्ञ समर्थ रामदास स्वामी हा लेख प्रसिद्ध झाला आहे.समर्थ व  शिवरायांच्या भेटीचा त्यात संदर्भ मी इतिहास अभ्यासक म्हणून दिलेले नाही,तो माझ्या वाचनाच्या आधारे दिला आहे.(संदर्भ पुस्तक -श्रीसमर्थ लीलामृत ,लेखक कै.वा .दा .पळणीटकर गुरुजी ,प्रकाशक रीसमर्थ सेवा मंडळ,शके १९००  )त्यात समर्थ रामदास स्वामी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कोणताही आक्षेपार्ह मजकूर नाही.तथापि काही इतिहास तज्ञांच्या मते समर्थांची व शिवाजी महाराजांची भेट झालेलीच नव्हती .माझ्या लिखाणामुळे अशा इतिहास तज्ञांच्या व  त्यांच्या समर्थकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे.सदर  इतिहास तज्ञांच्या व  त्यांच्या समर्थकांच्या दुखावल्या गेलेल्या भावनांबाबत मी दिलगीर आहे. "

               या दिलगिरी प्रदर्शनात राया उपासनी यांनी काही इतिहासकार यांच्या मतांचा जो उल्लेख केला आहे तो सरळ सरळ मराठा सेवा संघच्या विचार्वतांकडे अंगुली निर्देश करतो.कालच्या त्यांच्याशी  केलेल्या संभाषणात ते सेवा संघाला आणि त्यांच्या कक्ष्यांना जातीयवादी ठरवत होते.म्हणजे याचा अर्थ असा निघतो कि रामदास भेटीचा पुरावा आहे पण तो सेवा संघाच्या इतिहासकारांना मान्य नाही.म्हणून त्यांनी अशाच इतिहासकारांची आणि समर्थकांची माफी मागितली आहे.आणि मुल मुद्द्याला बगल दिली आहे.बरे त्यांनी जे संदर्भ म्हणून चोपडे दिलेले आहे ते हि ऐतिहासिक साधन संदर्भात मोडत नाही.विशेष गोष्ट ते स्वत कबुल करतात कि मी इतिहासाचा अभ्यासक नाही तरीही रामदास भेतीसारख्या वादग्रस्त मुद्द्यावर ते भाष्य करतात आणि दिव्या मराठीवले ते निर्लज्जपणे छापतात हा बामणी दहशतवाद आहे. जर आपण इतिहास अभ्यासक नाही तर इतिहासावर भाष्य करायचेच कशाला ?  

               बरे त्यांनी जो लेख मानसोपचार तज्ञ म्हणून छापला आहे त्यात  शिवरायांचा संबंध येतच नाही.जी कथा त्यांनी दिली आहे ती मोघमपणे दिली आहे.त्याला कसलाही पुरावा तर नाहीच पण कथेची सुरुवात ते एका किल्ल्याचे बांधकाम असा करतात.म्हणजे किल्ला कोणता हे पण त्यांना माहित नाही.त्याचे बांधकाम कोणत्या साली सुरु होते हेही माहित नाही.तरीही ते रामदासाला मोठे ठरविण्यासाठी शिवरायांना मनोरुग्ण ठरवून मोकळे होतात.त्यांना याची जाणीव नसावी कि इतिहासलेखन म्हणजे परीकथा  लिहिणे नव्हे तर इतिहास लेखनासाठी पुराव्यांची गरज असते.रामदासाला कोणी मानसोपचार तज्ञ सांगो कि मनोरुग्ण म्हणून सांगो आम्हाला त्याचे काही देणे घेणे नाही परंतु या भटांनी आतातरी शिवरायांना बदनाम करणे थांबविले पाहिजे.

          वाचकांसाठी एक महत्वाची गोष्ट.सेवा संघाने सातत्याने सांगितले कि ज्या रामदासाचे चित्र चांगले नाही त्याचे चरित्र वाचायचे तरी कशाला? म्हणून बाम्नांनी आत रामदासाचे लांगोतीवारचे चित्र छापणे बंद केले असून त्याला पूर्ण कपड्यात दाखविले जात आहे.दंत कथा देवून शिवरायांना बदनाम करणाऱ्या राया उपासनी सारख्या तुकार लेखकांना तुकारामांच्याच शब्दात सांगावेसे वाटते कि -"नको  दंतकथा सांगो येथे कोणी / कोरडे ते मनी बोल कोण?". शिवजयंतीच्या तोंडावर महाराजांचा अपमान करणाऱ्या हरामखोरांचा निषेध करून आपण सर्वांनी आणखी जास्त जोमाने छत्रपती महोत्सव साजरा करुया.
 जय जिजाऊ !!!

  

3 comments:

  1. Vikrut manuvadyancha jahir nishedh..amhi maharajancha apman sahan karnar nahi...jay jijau jay shivray

    ReplyDelete
    Replies
    1. होय राजे नरेश या मनुवादी कृत्याचा जेवढा निषेध करू तेवढा कमीच आहे.

      Delete
  2. nakkich dikkaar aso hya vikrut manovruticha.

    ReplyDelete