Sunday 19 August 2012

राज्याबाहेरील बाहेरील मराठ्यांचे प्रबोधन करणारा- शिवाजी समाज.




माझे मराठ्यांनो षंढ झालात काय हे पुस्तक एव्हाना मध्यप्रदेश,गुजरात,जम्मू काश्मीर, पंजाब, कर्नाटका, गोवा, छत्तीसगड आदि राज्यात जाऊन पोचले आहे. प्रतिक्रियेच्या निमित्ताने का होईना राज्याबाहेरील मराठा बांधव माझ्याशी संपर्क साधतात आणि आपले राज्य सोडूनही मराठे बाहेरच्या राज्यात स्थाईक झाले आहेत याची मला जाणीव होते. कर्नाटक राज्यातून तर या पुस्तकाचे कन्नड भाषेत भाषांतर करावे असे विनंतीवजा पत्रही प्राप्त झाले आहे. असाच प्रकार गेल्या जून महिन्यात घडला. औरंगाबाद क्रांती चौक पोस्ट खात्यातून मला फोन आला की डॉ.बालाजी जाधव आपल्यासाठी इंदौरहून एक समाचार पत्र आले आहे परंतु त्यावर आपला पूर्ण पत्ता नाही. तर फक्त नाव आणि नंबर आहे. मी माझा पत्ता सांगितला आणि ते समाचार पत्र माझ्या हातात पडले. समाचार पत्राचे नावच "शिवाजी समाज " असे होते. बाहेरच्या राज्यात महाराजांच्या नावाने असे कोणते समाचार पत्र असेल असा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. म्हणून ते पत्र वाचून मला सुखद आश्चर्याचा धक्काच बसला. महाराष्ट्रतील मराठ्यांना हे माहित नसेल की आपले राज्य सोडून देशभरात सुमारे २ कोटी मराठे आहेत. परंतु आपण आपल्याच मातीत मराठ्यांशी संबंध ठेवत नाही तर मग अशा बाहेरच्या लोकांशी केव्हा ठेवणार?

या प्रसंगापूर्वी मला पानिपत येथे मराठे स्थाईक झाले आहेत याची माहिती होती. त्यांना 'रोड मराठा' असे म्हटले जाते. एवढेच नाही तर औरंगाबाद जिल्ह्यातील लासूर गावी माझ्या व्याख्यानाला सुद्धा काही पानिपत येथील मराठे आले होते. मी कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्याच हस्ते केले. अर्थात ती मंडळी त्यांच्या कामानिमित्त्य या गावात आली होती. परंतु एवढ्या लांबवरच्या मराठ्यांना भेटल्याचा आनंद काही औरच होता. दरवर्षी १२ जानेवारीला सिंदखेडराजाला आणि ६ जूनला रायगडावर  ही मंडळी प्रचंड संखेने जमते. तर बांधवांनो सांगण्याचे तात्पर्य असे की "मराठा सेवा संघाच्या माध्यमातून " आपण मराठा तितुका मेळवावा, गुण दोषासह स्वीकारावा हे ब्रीद स्वीकारले आहे. मग आता आपल्या समोरची पुढच पायरी म्हणजे या राज्याबाहेर विखुरलेल्या  मराठ्यांना आपल्याशी  जोडणे. त्यांच्या सोबत बेटी व्यवहार प्रस्थापित करणे, कुण्याही मराठी नेत्याचे न ऐकता त्यांची भाषा शिकून घेणे. साधी गोष्ट आहे आजकाल ब्राह्मण समाज सुद्धा सर्व भाषिक संमेलने घेऊ लागला आहे मग आपणही आपल्यातील हे भाषिक आणि प्रांतिक भेद मिटविण्यास सज्ज राहिले पाहिजे. त्या शिवाय मराठा समाज हा देश पातळीवर एक होणार नाही आणि देशाच्या  मुख्य प्रवाहात येणार नाही. आजकाल बरेच लोक देश पातळीवर एकत्र येत आहेत. उदा. जैन समाज, मुस्लीम समाज, बौद्ध समाज, शीख समाज वगैरे वगैरे. मग इतिहासाचा उज्वल वसा आणि वारसा लाभलेल्या आणि अटकेपार झेंडे फडकवलेल्या मराठ्यांनीच यात मागे का बरे राहावे?

मध्य प्रदेशातील मराठा बांधवांना संघटीत आणि प्रबोधित करण्याचे कार्य शिवश्री डॉ.वसंतराव सोनोने आणि शिवमती डॉ.चंद्रकला सोनोने हे मराठा द्वय करत आहेत. हे पती-पत्नी सातत्याने युगानायक पुरुषोत्तम खेडेकर, प्रवीण दादा गायकवाड, छत्रपती संभाजी राजे, अनंत दारवटकर, डॉ.वसंत मोरे आदींच्या संपर्कात असतात. या दोहोंनी मिळून समाजाला जागृत करण्यासाठी "शिवाजी समाज " नावाचे वर्तमान पत्र सुरु केले आहे. हे पत्र ते इंदौरहून चालवतात. या समाचार पत्राचे हे २१ वे वर्ष असून आजपर्यंत याचे ४३ अंक निघाले आहेत. साधारणतः १२ पानाचे हे समाचार पत्र आहे. ज्याचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ  दोन्हीही रंगीत असून अत्यंत आकर्षक असतात. तसे या समाचार पत्राची किंमत १० रुपये असून वार्षिक वर्गणी फक्त १०० रुपये आहे. ज्यांना कुणाला या अंकाचे आजीवन सभासद व्हायचे असेल त्यांनी १००० रुपये शिवाजी समाजच्या करंट  खात्यात जमा करावेत. बँकेचा पत्ता आहे- "भारतीय स्टेट बँक, नेमी नगर शाखा, इंदौर. कोड नं. ३०३४४, खाते क्र. ६३०४३४५२८४६ " असा आहे. या उपर कुणाला हे समाज प्रबोधनाचे कार्य असेच निरंतर चालू राहावे असे वाटत असेल तर त्यांनी या कार्याला आपापल्या हस्ते मदत करावी.

आपल्या या मुखपत्राच्या माध्यमातून संपादकद्वयांनी काही मुद्दे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड प्रशासनापुढे ठेवले आहेत. आपण अपेक्षा करूया की त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण होतील. परंतु महाराष्ट्रात मराठे हे सत्ताधारी आणि संखेने प्रचंड असल्यामुळे त्यांनी आपल्या कडूनही अपेक्षा व्यक्त केलीय की "महाराष्ट्र के मराठा संघटनो व नेतृत्व वर्ग से यही निवेदन है की महाराष्ट्रा  के बाहर के मराठो के बारे मे विचार करणे का मुद्दा उनके अजेंडे मे हो. महाराष्ट्रा मे जब जब मराठी विरुद्ध  उत्तर भारतीय का सवाल उठता है तो हम लोगोन्के लिये जवाब देना मुश्कील हो जाता है. " या वरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करणाऱ्या मराठा बांधवांनी योग्य तो बोध घ्यावा आणि राज्याबाहेरील २ कोटी मराठ्यांचे अंतकरण समजून घ्यावे. बाकीच्या मराठ्यांनी पण या लोकांशी संबंध वाढवण्यासाठी विचार करावा. तरच खऱ्या अर्थाने  आपण जग जिंकण्याच्या लायकीचे बनुयात.

जय जिजाऊ !!!

डॉ.बालाजी जाधव, औरंगाबाद.
मो-९४ २२ ५२ ८२ ९० 

Sunday 12 August 2012

वाघ्याचा इतिहासात कुठेही उल्लेख नाही, १० ऑगस्ट २०१२ च्या दैनिक दिव्य मराठीतील बातमी.




शिव पत्नीच्या समाधीवर बसविलेला वाघ्या हा काल्पनिक आहे हे आतां सर्वमान्य झाले आहे. परंतु १ ऑगस्ट २०१२ ला संभाजी ब्रिगेडच्या ७३ मावळ्यांनी जेव्हा हा अनैतिहासिक वाघ्या शिव पत्नीच्या समाधीवरून हटविला तेव्हा काही वाघ्याच्या अनौरस औलादींनी आपला बाप मेल्याच्या अविर्भावात गळे काढले होते. काहींनी तर उपोषणाचे  वापरून वापरून बोथट झालेले हत्यारही आजमावून पहिले होते. या सर्व घडामोडींमुळे सामान्य जनता मात्र संभ्रमात होती. कुणाचे खरे आणि कुणाचे खोटे हेच जनतेला समजत नव्हते. अशावेळी महत्वाची भूमिका बजावली ते काही वर्तमान पत्रांनी. त्यात दै.पुण्य नगरी , दै.देशोन्नती यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. तशातच दै.दिव्य मराठीचे संपादक शिवश्री.धनंजय लांबे यांना मी विनंती केली की अशा संवेदनशील मुद्द्याच्या वेळी आणि सामान्य जनता संभ्रमात असताना आपण संभाजी ब्रिगेडची भूमिका लोकांपर्यंत पोचवा. आणि माझ्या विनंतीला मान देऊन, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवश्री.धनंजय लांबे सरांनी खालील बातमी दै.दिव्य मराठीच्या 'मराठी मुलुख '  या ३ न. च्या पानावर लावली. या मुले साधारणतः हे वर्तमान पत्र जिथे जिथे जाते तिथल्या वाचकांना वाघ्याचा फोलपणा लक्षात आला. आणि बरे झाले वाघ्या काढल्या गेला होता ते अशा प्रतिक्रिया जन सामान्यात उमटायला लागल्या.भविष्यात जेव्हा कायदेशीर रित्या वाघ्या काढल्या जाईल तेव्हा हा समाज संभाजी ब्रिगेडच्या पाठीशी राहिल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही. संभाजी ब्रिगेडची भूमिका सर्व सामान्य जनते पर्यंत पोचवल्या बद्दल शिवश्री. धनंजय लांबे सर आणि दै.दिव्य मराठी  यांचे मनपूर्वक आभार.

Tuesday 7 August 2012

बाळ ठाकरे ला मारा, आम्ही वाघ्या काढतो.


राष्ट्रीय समाज पक्ष  या अकौंट धारकाशी ओनलाईन संवादाचा हाच तो भाग.
 परवा मी फेसबुकवर बसलो असताना "राष्ट्रीय समाज पक्ष " नावाच्या अकौंट धारकाने माझ्याशी च्याटीग सुरु केली. सुरुवातीला त्याने मला "नाराज आहात काय ?"  असा खवचट प्रश्न विचारला. मी म्हटलं भाऊ नाराज नाही पण वाईट वाटले की आपलेच धनगर बांधव विनाकारण विरोधात गेलेत याचे. तो म्हणाला सुरुवात तुम्ही केली. मी म्हटलं आपल्या अपमानाची प्रतिक आपण झुगारून लावली पाहिजेत. त्याने पुन्हा वाघ्याला पुरावा आहे असे सांगितले. इथं पर्यंत ठीक होतं परंतु त्या "राष्ट्रीय समाज पक्ष " नावाच्या अकौंट माझ्याशी जी काही चर्चा केली टी वाचून मला आश्चर्याचा धक्काच बसला.तो म्हणाला की शिवरायांचा वाघ्या पेक्षा जास्त अपमान ब्राह्मणांनी केला. मी म्ह्टलं होय ठीक आहे. मग त्याने काय म्हणावे? तो म्हणाला की त्यातही जास्त बदनामी पुरंदरे आणि बाळ ठाकरे  ( "राष्ट्रीय समाज पक्ष " नावाच्या अकौंट धारकाचे उद्गार ) याने केलेली आहे. तर मग तुम्ही लोकानी (म्हणजे संभाजी ब्रिगेडच्या )  त्या बाळ ठाकरे आणि बाबा पुरांदरेला मारून टाका  मग धनगर समाज स्वताहून कुत्र्याला तिथून काढील. मला धक्काच बसला. की धनगर समाज बांधव नेमके कशाच्या विरोधात आहेत? कुत्र्याच्या , बाळ ठाकरे-पुरांदरेच्या की केवळ मराठ्यांच्या ? एकीकडे वाघ्या काढला आमची अस्मिता दुखावली म्हणून त्यांचे राष्ट्रीय  नेते सम्भाजी ब्रिगेडवर बंदी घालण्याची भाषा करत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचा जबाबदार कार्यकर्ता बाळ ठाकरे - पुरांदरेच्या हत्येची गोष्ट करतो. यातले नेमके काय सत्य धरावे ? तुम्ही त्यांना मारा आम्ही वाघ्याला काढतो असे म्हणणे म्हणजे या लोकांना माहित आहे की त्या वाघ्या कुत्र्याला कसलाच ऐतिहासिक पुरावा नाही. नव्हे हा वाघ्या धनगरांची अस्मिता पण नाही. (अन्यथा संभाजी ब्रिगेड विरोधात मोर्चे काढणाऱ्या पक्षाचे नाव  धारण करणाऱ्याने आम्ही स्वतहून वाघ्या काढू असे म्हटलेच नसते.) याचाच अर्थ हा विरोध फक्त मराठा द्वेषातून होतो आहे की काय?


पुढे मी त्याला समजावले की बाबारे लोकशाहीमध्ये एखदयाला जिवंत मारून टाकणे असले प्रकार शोभून दिसत नाहीत. भारतात बाबासाहेबांची राज्य घटना लागू आहे मनू स्मृती नाही. तो म्हणाला मग तुम्ही लोकांनी वाघ्या का फोडला ? त्याला समजावले की वाघ्या दगडी आहे आणि त्यामुळे शिवरायांची बदनामी होते. मग पुन्हा तो म्हणाला की पुरांदरेने केलेली बदनामी कमी आहे काय? अगोदर त्याचे काय ते बघा नंतर वाघ्याचे बघू. नंतर शिवरायांचा "जय शिवाजी " असा एकेरी उच्चार करून त्याने संवादाला पूर्ण विराम दिला. म्हणजे या लोकांना असे म्हणायचे आहे की ब्राह्मण समाजाने जर महाराजांची बदनामी केली असेल तर मग त्यांच्या कत्तली करा. मगच वाघ्या विषयी बोला? कसली भाषा आहे ही. हरी नरके- संजय  सोनवणी या सारखे दिग्गज समतावादी यांच्या पाठीशी असताना यांचे हे असले विचार ? नरके सिरांनी तर संभाजी ब्रिगेड वाल्यांचा आदर्श हिटलर आहे म्हणून त्यांना टार्गेट केले होते. बर संजय सोनवणी सुद्धा त्यांच्या ब्लॉगवरून सारखे तटस्थ राहा असे आवाहन करत असतात. तरीही त्यांचा लिखाणाचा प्रतिवाद करणाऱ्या कुण्या शिवालिक वर्माला एका अद्न्यात व्यक्तीने "समोर ये खांडोळी खांडोळी करतो " अशी धमकी दिल्याचे वर्माच्या प्रतिक्रियेत वाचले. आता याचा अर्थ काय लावायचा?

आता समजा मी रागाच्या भरात एखाद्याला म्हटले की -"मी तुला मारून टाकेल " आणि माझ्या सोबत असणाऱ्या मित्राने लगेच अरेरे तुम्ही हिंसक आहात म्हणून माझी साथ सोडली. तर त्याने या नंतर अहिंसेचा आणि माझ्यापेक्षा योग्य मार्ग अवलम्बायचा की "तूच तर म्हटलं होतास की त्याला मारून टाकेल, मग आत्ता का मारून टाकले नाही ?"असे म्हणायचे ? म्हणजे माझ्या हिंसक भाषेमुळे दुखावून गेलेला माझा मित्र जर तू त्याला का मारले नाही म्हणत असेल तर माझ्या पेक्षा जास्त गरज त्यालाच जाणवते.  म्हणून तो चिथावणीखोर भाषा वापरत आहे. मग तो अहिंसक कसा ? पुष्य मित्र शुंगाने हजारो बौद्धांच्या कत्तली केल्या मग बौद्ध बांधवांनी काय तलवारी घेऊन ब्राह्मणांच्या कत्तलीच केल्या काय?  तर नाही. ज्या ब्रह्माणी विचारसरणीमुळे बौद्ध कापले गेले ती विचारधाराच समूळ उध्वस्त करायचा प्रयत्न बौद्ध धम्माच्या माध्यमातून चालविला. हाच मुद्दा बाबासाहेबांच्या प्रसंगा वरूनही स्पष्ट होईल. ज्या मनुस्मृती मुळे दलितांना हीन जीवन जगावे लागले   ती मनुस्मृतीच बाबासाहेबांनी जाळून टाकली. नाकी तिचे आचरण करणाऱ्या ब्राह्मण समाजाला त्यांनी कत्तलीद्वारे संपवायचा प्रयत्न केला.

फुलेंनीही लिहून ठेवले आहे की भटांनी तुम्ही लिहिलेली धर्मग्रंथ तुम्हीच जाळून नसत करा, अन्यथा बहुजन समाज जागा झाला तर त्या ग्रंथाच्या होळीत तुम्ह्लाही जाळायला कमी करणार नाही. अर्थात ज्या लोकांनी आमच्यावर अपमानाची प्रतिक लादली ती प्रतिक त्यांच्या विकृत विचारांसाहित नस्त् करावी लागतात. वाघ्याचे शिल्पही शिवरायांना कुत्र्याचा दर्जा देणारे आहे. म्हणून तेही काढायला पाहिजे. याचा अर्थ ज्यांनी ती लादली त्यांच्या कत्तली करणे गरजेचे आहेच असे काही नाही.

म्हणून धनगर समाज बांधवांनी केवळ विरोधाला विरोध न करता या मागची पार्श्वभूमी समजून घ्यावी. बामनांनी शिवरायांचा अपमान केला असूनही तुम्ही त्यांना कापत नाही मग तुम्हाला आम्ही वाघ्या काढू देणार नाही. असले आडमुठे धोरण स्वीकारू नये.  पण समजत नाही ब्रिगेडवर हिंसकतेचा आरोप करून दूर गेलेले नरके - सोनवणी ही मंडळी आत्ता का गप्प आहे?

Saturday 4 August 2012

'वाघ्या'ची आख्यायिका (४ ओगस्ट २०१२ च्या पुण्य नगरीतील अग्रलेख)

            रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारील सन 1936 मध्ये उभारण्यात आलेल्या वाघ्या कुर्त्याचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या बहाद्दर कार्यकत्र्यांनी उद्ध्वस्त केला. त्यानंतर सरकारने दबावाला बळी पडून त्या पुतळ्याची पुनस्र्थापना केल्याने आता नवीन वादाला तोंड फुटणार असाच रागरंग दिसतो. कारण या अस्मितेशी संभाजी ब्रिगेडच काय कोणीच तडजोड स्वीकारणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला दंतकथेवर आधारित भाकड संदर्भ चिटकून अधून-मधून जो वादंग उद्भवतो तो टाळण्यासाठी या इतिहासाचे वस्तुनिष्ठ संशोधन झाले पाहिजे. युगपुरुषाच्या इतिहासाचे विकृतीकरण कसे केले जाते, ही बाब जेम्स लेन या माथेफिरू इंग्रजी लेखकाच्या पुस्तकातून स्पष्ट झाली. त्यातूनच पुण्यातील भांडारकर इन्स्टिटय़ूटची संभाजी ब्रिगेडने मोडतोड केली. त्या वेळी त्यांना 'गुंड' म्हणून संबोधण्यात आले. त्यांच्याविरोधात मोठा गजहब झाला, पण तद्नंतर जेव्हा वस्तुस्थिती पुढे आली तेव्हा संभाजी ब्रिगेडची भूमिकाच योग्य होती, ही बाब सर्वमान्य झाली. जेम्स लेन प्रकरणावर पडदा पडल्यानंतर संभाजी बिग्रेडने दादोजी कोंडदेव यांचा वाद ऐरणीवर घेतला. त्यांनी दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, असा दावा केला. त्यासाठी इतिहास संशोधकांना ललकारून त्यांना ऐतिहासिक सबळ पुरावा देण्याचे आवाहन केले, पण त्यांना एका पाठोपाठ एक मुदत देऊनही ते सिद्ध करू शकले नाहीत. परिणामी संभाजी ब्रिगेडने पुण्याच्या लालमहालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा रातोरात हलवला. उलट - सुलट चर्चा झडली, पण कोणी अजूनही पुरावा देऊ शकले नाही. इतिहासाचा कोणताच संदर्भ नसेल तर केवळ श्रद्धेपोटी तो वस्तुनिष्ठ कसा मानता येईल. तेव्हा संभाजी ब्रिगेडचा विरोध अनाठायी म्हणता येणारच नाही. संभाजी ब्रिगेडला 'बोल' लावून मनुवाद्यांच्या इतिहासाचे विकृतीकरण किती काळ सहज करायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माबाबतच इतिहासातील वाद-विवादाला सुरुवात होते. महाराष्ट्र सरकारने त्यावर इतिहास संशोधकांच्या माध्यमातून संशोधन करून तो जाहीर केला तरी अनेक पक्ष आणि मंडळी आपला हेका दरवर्षी चालवतातच ना, हे कशाचे द्योतक मानायचे. रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुर्त्याचा पुतळा त्याच कपोकल्पित पठडीतील आहे. म्हणून तर संभाजी ब्रिगेड विरोध करत आहे. वाघ्या कुर्त्याचे समर्थक कोणताच ऐतिहासिक पुरावा अथवा संदर्भ का देऊ शकत नाहीत. महाराजांचा इमानी कुत्रा म्हणून मानल्या जाणार्‍या वाघ्या कुर्त्याने महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चितेत उडी मारली होती, अशी आख्यायिका रंगून सांगणे म्हणजे इतिहास नव्हे. राम गणेश गडकरी यांच्या 'राजसंन्यास' या नाटकात आलेल्या कुर्त्याच्या या उल्लेखावरून हा इतिहास समजणे संयुक्तिक नाही. गडकरी हे काही इतिहास संशोधक नव्हते ते नाटककार होते. भाकडकथा नाटक-सिनेमात उठून दिसतात इतिहासात नाहीत. इतिहास, दंतकथा आणि श्रद्धा याची सरमिसळ सामाजिकदृष्टय़ा हानीकारक ठरते. तेव्हा इतिहास जशाच्या तसाच स्वीकारावा लागतो. तशी अवस्था दंतकथा अथवा श्रद्धेची नसते. राम गणेश गडकरी यांचे नाटक हा ऐतिहासिक दस्तऐवज मानला, तर छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी होणार नाही का ? ती वाघ्या कुर्त्याच्या समर्थकांना मान्य होईल का, याचे उत्तर द्यावे. महात्मा फुले यांनी 1869 साली रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांच्या समाधीचा प्रथम जीर्णोद्धार केला. शिवरायांवर प्रदीर्घ पोवडा लिहिला पण त्यात या कुर्त्याबाबत कोठेच उल्लेख नाही. 1981-82 च्या दरम्यान इंग्रजी लेखकजेम्स डग्लस यांनी शिवरायांवर अभ्यास करून पुस्तक लिहिले, त्यात कोठे हा संदर्भ नाही. 1929 साली वि. वा. जोशींनी राजधानी रायगड नावाचे पुस्तक लिहिले, त्यातही या कुर्त्याचा संदर्भ कोठे आढळत नाही. जेधे शकावली आणि अन्य तत्कालीन साहित्यात कोठेच उल्लेख नसताना केवळ गडकरींच्या नाटकावरून वाघ्या कुर्त्याचे उदात्तीकरण करणे ही नाटय़रूप विकृती ठरते. ती टाळण्यासाठी संभाजी ब्रिगेडने तीन वर्षे सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला. पुराव्याच्या संशोधनाची मागणी केली. पुरातत्त्व विभागाकडे कोणता ठोस पुरावा नसल्यानेच संभाजी ब्रिगेडने वाघ्या कुर्त्याचा पुतळा उद्ध्वस्त केला. सरकारने त्याची पुनस्र्थापना केल्याने राज्य सरकारने आता एक तर ऐतिहासिक पुरावे द्यावेत अन्यथा संभाजी ब्रिगेडची मागणी मान्य करावी.

Wednesday 1 August 2012

वाघ्या जमीनदोस्त....

     पुण्यातील लाल महालातील दादूचे अनैतिहासिक शिल्प हटविल्यानंतर संभाजी ब्रिगेडने आपले लक्ष दादू सारख्याच अनैतिहासिक असणाऱ्या रायगडावरील वाघ्याच्या कुत्र्याच्या शिल्पाकडे वळवले. ६ जून ला दरवर्षी शिवराज्याभिषेक दिन साजरा होत असतो. २०११ सालच्या शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्या संबंधीची बैठक कोल्हापूरच्या तुळजाभवानी मंदिरात पार पडली. याच बैठकीत वाघ्याच्या या अनैतिहासिक शिल्पाचा मुद्दा पुढे आला. या कुत्र्याच्या शिल्पाला इतिहासामध्ये कसलाही ऐतिहासिक आधार नसल्यामुळे त्याचे शिल्प शिवरायांच्या पवित्र समाधीसमोर असणे हा इतिहासाचा आणि परिणामी शिवरायांचा अपमान आहे.त्यामुळे हे काल्पनिक शिल्पच पुरातत्व खात्याने काढून टाकावे अशी मागणी पुढे आली आणि याला मान्यवर इतिहास संशोधकांनीही दुजोरा दिला. परंतु लोकशाही मार्गाने वारंवार मागणी करूनही मुर्दाड शासनाने हे शिल्प काढले नाही."परिणामी समाजाला योग्य  न्याय देण्यास शासन जेव्हा कमी पडते तेव्हा संभाजी ब्रिगेड सारख्या सामाजिक संघटनेला कायदा हातात घ्यावा लागतो.आणि याचाच प्रत्यय म्हणून  १ ओगस्ट २०१२ रोजी संभाजी ब्रिगेडने शिवरायांचा अपमान करणारे वाघ्याचे शिल्प काढून टाकले." सर्वप्रथम या कृत्याबद्दल संभाजी ब्रिगेडच्या बहाद्दर मावळ्यांचे हार्दिक अभिनंदन. परंतु याप्रकारामुळे सर्वसामान्य जन मात्र संभ्रमित झाले आहेत त्यांच्यासाठीच हा लेखन प्रपंच.

     वाघ्याच्या संबंधी एक दंतकथा सांगितली जाते की"  महाराजांचा  अंत झाल्यावर त्यांचे प्रेत पालखीत घालून दहनभूमिवर आणले. त्यावेळी त्यांचा आवडता कुत्राही बरोबर आला होता.दहनविधी आटोपल्यावर पालखीत महाराज नसून ती रिकामी चालली आहे ,असे पाहताच त्या कुत्र्याने धावत जाऊन एकदम महाराजांच्या चितेत उडी  घेतली  आणि स्वतास जाळून घेतले ." अशाप्रकारची दंतकथा सर्वप्रथम ची.ग.गोगटे यांनी १९०५ मध्ये प्रकाशित केलेल्या "महाराष्ट्र देशातील किल्ले " या पुस्तकात आली आहे. परंतु यापूर्वी या कथेचा उल्लेख कोणत्याही अस्सल साधनात झाला नाही.१८६९ मध्ये महात्मा ज्योतीराव फुले यांनी अथक परिश्रम घेऊन शिवरायांची समाधी शोधून काढली आणि शिवरायावरचा जगातील सर्वात मोठा पोवाडा लिहिला पण त्या पोवाड्यमध्ये एका शब्दानेही फुलेंनी वाघ्याचा उल्लेख केला नाही.यानंतर १८८१-८२ मध्ये "जेम्स डग्लस " नावाचा एक इंग्रज अधिकारीही रायगडावर गेला होता.त्याने आपल्या "बुक्स ऑफ बॉम्बे " या पुस्तकात रायगडचे वर्णन लिहून ठेवले आहे. या पुस्तकातही वाघ्याचा उल्लेख नाही. १८८५ ला मुंबई इलाख्याचे गवर्नर "सर रिचर्ड टेम्पल "हेदेखील रायगड पाहण्यासाठी गेले होते.यावेळी त्यांच्यासोबत "क्रोफर्ड" नावाचा एक इंग्रजी इसम होता. त्याने या रायगड भेटीवर आधारित "अवर ट्रबल इन पूना एंड डेक्कन " हे पुस्तक लिहिले.पण फुले आणि जेम्स डग्लस प्रमाणेच याही पुस्तकात वाघ्याचा साधा उल्लेख देखील नाही.एवढेच नव्हे तर १९२९ साली प्रकाशित झालेल्या "राजधानी रायगड " या वी.वा.जोशी लिखित  अभ्यासपूर्ण पुस्तकातही कुत्र्याचा किंवा समाधीचा नामनिर्देश नाही. म्हणजेच वाघ्या कुत्र्याचा  शिवरायांच्या काळातील अस्सल पुरावातर नाहीच परंतु १८६९ ते १९२९ पर्यन्त सुद्धा कुणीही वाघ्याची साधी दाखलही घेत नाही  यावरूनच हा वाघ्या नावाचा प्रकार बऱ्याच नंतर कुण्यातरी अट्टल शेंडीधार्यांनी घुसडला आहे हे चटकन लक्षात येते.
   
      मग हे शिल्प आले  कोठून? तर बाळ गंगाधर टिळकाने रायगडावरील शिव् समाधीचा  जीर्णोद्धार करण्यासाठी 'श्री शिवाजी मेमोरिअल ट्रस्टची ' स्थापना केली.या माध्यमातून टिळकाने बराच पैसा घशात घातला पण मरे पर्यंत हे जीर्णोद्धाराचे काम पूर्ण होऊ दिले नाही.टिळक मेल्यानंतर १९२७ मध्ये हे काम कसेबसे  पूर्ण झाल्यानंतरही पैश्याच्या लालचीने टिळक अनुयायांनी बहुजन समाजाकडून चंदा उकळण्याचे काम सुरूच ठेवले.नेमके याच वेळेस राज्यात 'ब्राह्मण-ब्राह्मनेत्तर वाद ' शिगेला पोचला होता आणि या वादात ब्राहमणवादी चारीमुंड्या चित् होऊन जमीनदोस्त झाले होते.  खायला मिळाले की खा खा खायचे आणि पोट भरले  की खालेल्या ताटातच हागून ठेवायचे अशी इथल्या भटांची जुनीच रीत असल्यामुळे आपल्या या पराभवाचा वचपा काढण्यासाठी 'श्री शिवाजी मेमोरिअल ट्रस्ट' च्या  ब्राह्मणांनी  शिवरायांची बदनामी करणारे  कुत्र्याचे शिल्प त्यांच्याच समाधी समोर बसवून घेतले. यावेळी या कुत्र्याचे बारसे झाले नव्हते. पण या देशात शिवरायांचे चरित्र कायम वादग्रस्त बनवून ठेवण्यासाठी आपल्या शेंडीला गाठ मारून बसलेले  पुष्कळ बाष्कळ भट आहेत. त्यांच्यातीलच एक असणाऱ्या आणि एकच प्याला घेऊन उताना पडणाऱ्या 'राम गणेश गडकर्याने ' आपल्या राजसंन्यास या नाटकात या कुत्र्याचे वाघ्या असे नामकरण केले आणि संभाजी राजांची अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन बदनामी करणारे आपले नाटक या वाघ्याच्या चरणी अर्पण करून चिरनिद्रा घेतली. तेव्हापासून हा कुत्रा तमाम शिवभक्तांच्या अस्मितेवर फतकल मारून बसला होता तो आता ब्रिगेडने उठवला.

     .....खरे तर यामुळे होळकरांची बदनामी होते.

        दादू काढला आणि तमामभट भाईंना सुतक पडले परंतु टिळकाच्या पुण्य(?)तिथीच्या मुहूर्तावर वाघ्या काढल्यानंतर भट भाईंना मात्र सुतक पडले नाही. सुतक पडले ते आमचेच हाडा मासाचे भाऊ असणाऱ्या धनगर बांधवांना. (परंतु सर्वच बांधव असा सुतकी चेहरा करून बसले नाहीत, तर काहीनी संभाजी ब्रिगेडची भूमिका  उचलून धरली आहे.)  वाघ्या बद्दल धनगर समाजाच्या भावना फारच तीव्र झालेल्या सध्या पाहायला मिळत आहेत. ज्या लोकांना भांडारकरी हरीचे लाल उपदेश देतात त्यांची अस्मिता कुत्र्याच्या चरणी वाहणार नाही तर काय होळकरांच्या चरणी वाहणार आहे काय? वाघ्याच्या निमित्ताने धनगर  समाज बांधवांनी संभाजी ब्रिगेडचे आभार मानावेत कारण वाघ्याचा हा पुतळा जसा शिवरायांचा अपमान करत होता तसाच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त तो होळकरांची बदनामी करत होता. इंदूरचे होळकर हे कट्टर शिवभक्त होते. पुतळा उभारण्याच्या काळात इंदूरच्या गादीवर तुकोजी होळकर होते.शाहू महाराजांनी जेव्हा पुण्यात शिवरायांचा जगातला पहिला पुतळा उभा करण्याचे ठरविले तेव्हा याच तुकोजीरावांनी पुतळ्याच्या पायाभरणी साठी भरघोस आर्थिक मदत केली होती. जेव्हा  कृष्णाजी अर्जुन केळूस्करांनी शिवरायांचे पहिले वहिले शिवचरित्र लिहिले  तेव्हा याच तुकोजी होळकरांनी त्या पुस्तकाच्या शेकडो प्रती विकत घेऊन जगभरातल्या ग्रंथालयांना धाडल्या होत्या.इतकेच नव्हे तर केळूस्करांवर झालेले मोठे कर्ज फेडन्यामागेही  याच होळकरांचा हात होता. मग असे शिवभक्त असणारे तुकोजी होळकर केवळ इंग्रजांना घाबरून शिव समाधी जीर्णोद्धाराला मदत न करता एका कुत्र्याची समाधी उभी करतील? माझ्या धनगर भावांनो "शोध शिव् समाधीचा" या पुस्तकात गोपाल चांदोरकर नावाचा बामन लिहितो की होळकर हे इंग्रजांना घाबरत होते म्हणून ते समाधीच्या कामासाठी पैसे देत नव्हते म्हणून आम्ही कुत्र्याचे नाव पुढे करून त्यांच्याकडून देणगी उकळली . अरे हा आहे धनगर अस्मितेचा अपमान. हा आहे मराठ्यांच्या शूर सरदारांचा अपमान.हा आहे पराक्रमी होळकर खानदानाचा अपमान. तुकोजी होळकरांना जर कुत्र्याचे स्मारक उभा करायचे असले असते तर त्यांनी स्वतःच्या इंदूर संस्थानात अशी हजारो स्मारके उभी केली असती.त्यासाठी हजारो मैल दूर असणारा रायगड निवडला नसता.पण नको त्या हरीचे उपदेश ऐकून आम्ही भरकटलो तर नाही नं? विचार करा बांधवांनो विचार करा. आपण एकाच  आईची लेकरे आहोत आणि आपला शत्रूही एकच आहे . असे असताना आपापसात लढणे कशासाठी? अरे वाघ्याच्या निमित्ताने तरी करू या आपल्या अस्सल  अस्मितेचे स्मरण, घेवूया हाती तलवार आणि करू या खांडोळी  आम्हाला आमच्याच बापाचा खोटा इतिहास सांगणाऱ्या नमक हरामी औलादींची. चला बोला जय जीजाऊ-जय शिवराय -जय अहिल्या - जय मल्हार !

बोला हर हर महादेव !!!


(विशेष सूचना : कुत्राप्रेमिंच्या तीव्र भावना लक्षात घेऊन वादासाठी असे मान्यही करुया की वाघ्या हा काल्पनिक नसून खरा आहे. जसा गणपतीचा उंदीरही खरा खुरा असतो तसा.पण मग काय आपण गणपती सोडून उंदराचे स्मारक भले मोठे बान्धतो काय?)