फडणवीस सरकारने
यंदाचा “महाष्ट्रभूषण पुरस्कार” वादग्रस्त कादंबरीकार व तथाकथित शिवशाहीर ब. मो.
पुरंदरे यांना जाहीर केला. फडणवीस सरकारच्या या घाशिरामी निर्णयामुळे महाराष्ट्रात
संतापाची लाट उसळली. कारण ब. मो. पुरंदरे यांनी त्यांच्या लिखाणातून, नाटकातून
जागोजागी मांसाहेब जिजाऊ, राजे शहाजी, छ. शिवाजी महाराज आणि मराठा-कुणबी समाज
यांची बदनामी केलेली आहे. एवढेच नाही तर जेम्स लेन प्रकरणातही पुरंदरे यांचा सहभाग
असल्याचे समोर आले आहे. जेम्स लेन याने राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल जे वादग्रस्त
लेखन केले होते त्याला “असे काही लेखक
म्हणतात” अशी पुस्ती जोडली होती. पुरंदरे यांनी ज्या प्रकारे लेखन केलेले आहे ते
वाचून लेनच्या पुस्तकातील काही लेखक हे दुसरे तिसरे कुणी नसून ब.मो. पुरंदरेच आहेत
हे कोणत्याही जाणकार व्यक्तीच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. आपल्या लेखनाला
कसलाही आधार नसताना पुरंदरे यांनी कपोलकल्पित लेखन केलेले आहे. शिवजयंतीचा तारीख व
तिथी याचा वाद निर्माण करण्यात पुरंदरेच अग्रभागी होते. त्यांच्या या कारवायामुळे
कोल्हापूर येथे त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा एक कोटीचा दावाही गुदरण्यात आलेला आहे.
म्हणून राजमुद्रा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री संगम लांडगे यांनी ५ जुलै
२०१५ रोजी पेठवडज येथे शिवसन्मान जागर परिषद आयोजित केली होती. या परिषदेला
औरंगाबाद येथील प्रसिद्ध लेखक, वक्ते तथा प्रकाशक डॉ.बालाजी जाधव यांनी संबोधित
केले होते. डॉ. जाधव यांनी या परिषदेत पुरंदरे यांच्या विकृत लिखाणाची पोलखोल
केल्यामुळे राजमुद्राच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन त्या त्या ग्रामपंचायतीचे
ठराव मंजूर करून घेतले. त्यांच्या या उपक्रमाला प्रतिसाद देत आत्ता पर्यंत सुमारे
२० गावातील लोकांनी ब. मो. पुरंदरे यांचा महाराष्ट्र भूषण फडणवीस सरकारने रद्द
करावा असा ठराव केलेला आहे. महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात फडणवीस सरकारच्या
निषेधाचे ठराव मंजूर करून घेणारे कार्य करणारे राजमुद्रा प्रतिष्ठान हे बहुधा
पहिलेच असावे. त्यांच्या या कार्यामुळे समाजातल्या सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन
होत आहे.
ब.मो.पुरंदरे यांना
महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येऊ नये म्हणून नांदेड जिल्ह्यातील कंधार
तालुक्यातील खालील गावांनी निषेधाचे ठराव मंजूर केलेले आहेत.
१. आलेगाव २. बाळंतवाडी ३. बारूळ ४. बोरी ५. देवईची
वाडी ६. घागरदरा ७. हनमंतवाडी ८.कल्हाळी ९. कळका १०. खंडगाव ११. लालवाडी १२. मादाळी १३. मंगलसांगवी १४. मंगनाळी १५. नंदनशिवणी १६. रामानाईक तांडा १७.
संगुचीवाडी १८. सावरगाव (नि) १९. सावळेश्वर. २०. पेठवडज.
हे ऐतिहासिक कार्य करणारे राजमुद्रा प्रतिष्ठान
पेठवडजचे शिलेदार पुढीलप्रमाणे :
संगम लांडगे, नीलकंठ मुगावे, गजानन जाधव, भास्कर
कंधारे, खुशाल राजे, पांडुरंग कंधारे, रामदास डावकोरे, चंद्रकांत कारभारी, नामदेव
कदम, प्रसाद तेलंग, सचिन इंगोले, केशव गजेवाड, भानुदास नुकुलवाड ई.
बांधवांनो आपल्या या
सच्च्या शिवमावळ्यांचे फोन करून अभिनंदन करा आणि त्यांना प्रोत्साहन द्या :
संगम लांडगे (९४२२६९३९६०)
गजानन जाधव (९४२१५५१०४३) भास्कर कंधारे (९७६६८६२८७७) खुशाल राजे (९०११४४८७७७)
-डॉ.बालाजी जाधव.
मो-९४२२५२८२९०