Tuesday 22 August 2017

पंचफुला प्रकाशनाचे चॅनेल सुद्धा आले...SUBSCRIBE करा

https://youtu.be/UYXFqgt_gWU

केवळ शिवरायांसारखी दाढी वाढवून..... कपाळावर चंद्रकोर लावून.....मिशीला पीळ देऊन ..... आणि नावासमोर राजे लावून कुणी शिवरायांचे मावळे नाही होऊ शकत.... *त्यासाठी गरज आहे ती शिवरायांच्या विचारांचे अनुकरण करण्याची*

नेमकी हीच संकल्पना घेऊन *कपिल देसाई आणि तुषार देसाई* यांनी *अनुकरण की अनुसरण* नावाची एक शॉर्ट फिल्म बनवली.....

वरील लिंकवर क्लिक करून पूर्ण शॉर्टफिल्म पाहा आणि हा मॅसेज पुढे पाठवा..... *आपल्या प्रतिक्रिया Comment मध्ये लिहा*

*अशा प्रकारचे सामाजिक व्हिडीओ मोफत ऐकण्यासाठी व्हिडीओ खालील SUBSCRIBE या बटनावर क्लिक करा*

Wednesday 12 August 2015

राजमुद्रा प्रतिष्ठाण, पेठवडज यांच्या ऐतिहासिक कार्याची दैनिक मूलनिवासी नायक या दैनिकाने घेतलेली दखल



राजमुद्रा प्रतिष्ठाण, पेठवडज यांच्या ऐतिहासिक कार्याची दैनिक मूलनिवासी नायक या दैनिकाने घेतलेली दखल. वरील बातमी दै. मूलनिवासी नायक मध्ये दि. १० ऑगस्ट २०१५ ला प्रसिद्ध झालेली आहे. आम्ही दै. मूलनिवासी नायकच्या  संपादकांचे आभार मानतो. 


आपण असे कधी वागणार ?

सध्या एका संघटनेच्या राष्ट्रीय नेत्यावर अत्यंत खालच्या पातळीवर आरोप होत आहेत. ज्या लोकांनी त्यांचे संगठन सोडले आहे ते लोक समाजामध्ये काही प्रश्न उपस्थित करून कार्यकर्त्यांना विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या (अप) प्रचारामुळे बरेच कार्यकर्ते संगठना सोडत आहेत. काही तर अगदी सामुहिकरित्या संगठन सोडत आहेत. केडरबेस कार्यकर्ते टिकून असले तरी बऱ्याच प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या मनात या विषयी उगाचच संभ्रम निर्माण झाला आहे. ते काहीही असले तरी आज ही वेळ ज्या संगठनेवर आली तशीच वेळ बऱ्याच सामाजिक संघटनेवर एकदा तरी येत असते. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. नेतृत्वाबद्दलच प्रश्न चिन्ह निर्माण केले जाते. परंतु सामाजिक चळवळीत कार्य करत असताना मला असे वाटते की हे जे काही होत आहे किंवा होत असते ते अत्यंत चुकीचे आहे. आपला लढा हा या देशातील हजारो वर्ष जुने असणाऱ्या बलाढ्य अश्या ब्राह्मणवादी व्यवस्थेशी आहे. आपला शत्रू हा अत्यंत मजबूत आहे. खुनशी आहे. आजही सामान्य लोकांना प्रश्न पडतो की अवघा तीन टक्के असणारा हा समाज सगळ्या क्षेत्रात आपले वर्चस्व कसा काय टिकून असेल बरे? बांधवांनो याची बरीच करणे देता येतील. किंवा ही कारणे आपल्या इतिहास संशोधकांनी, समाजविश्लेषकांनी दिलेली आहेत. परंतु एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना मला वयक्तिकरित्या असे वाटते की ब्राह्मण समाज, त्यांच्या संगठना आणि त्यांचे स्वयंसेवक हे जाहीररित्या स्वजातीय नेतृत्वावर किंवा सामान्य कार्यकर्त्यावर कधीच टीका करत नाहीत. त्यांचा कधीच अवमान करत नाहीत. चार भिंतीत एकमेकांना लाथा घालतील परंतु जेव्हा समाजाचा मुद्दा येतो तेव्हा ही मंडळी मात्र कमालीची एकजूट दाखवते. त्यांच्या जातभाईने कितीही नीच पातळीचे काम केलेले असले तरी ते लोक त्याच्यावर कधीच टीका करत नाहीत. केले तर समर्थन करतील किंवा त्यावर मौन बाळगून बसतील पण त्याचे अवमूल्यन कधीच करणार नाहीत. रामदासाने आणि शेकडो वैदिक ग्रंथांनी जे सांगितले आहे की ब्राह्मण जरी झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ नेमके हेच सूत्र घेऊन ब्राह्मण समाज जगत असतो. आपला जातभाई भलेही बलात्कारी असेल, खुनी असेल, अतिरेकी असेल पण एकही ब्राह्मण त्याला तसे दाखवत नाही. अहो ही मंडळी तर एवढी निर्लज्ज आहेत की यांच्यातील खुनी अतिरेकी माणसांनाही हे हुतात्मा म्हणून प्रोजेक्ट करतात. आत्ता बोला. उदा. नथुराम गोडसे. ब्राह्मणी व्यवस्थेच्या हजारो वर्ष्यांच्या यशाचे जे गमक आहे ना? त्या अनेक कारणांपैकी हे कारण महत्वाचे आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते.

      खरेखुरे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की “पुरोगामी ब्राह्मण व प्रतिगामी ब्राह्मण हे एकाच शरीराच्या दोन भुजा आहेत आणि एकाच्या अस्तित्वासाठी दुसरा लढ्ल्याशिवाय राहत नाही.” बाबासाहेब असे का बरे म्हणाले असतील? बाबासाहेबांनी हे वाक्य अत्यंत अभ्यासातून चिंतनातून आणि स्वानुभवातून सांगीतलेले होते. आता बाबासाहेबांनी सांगितलेला हा सिद्धांत आजच्या पुरोगामी आणि प्रतिगामी ब्राह्मणांनाही लागू होतो काय? चला आपण याची काही उदाहरणे पाहू. महाराष्ट्रात जेव्हा जेम्स लेन प्रकरण घडले ते जरा आठवा. तेव्हापासून आजपर्यंत एकाही पुरोगामी किंवा प्रतिगामी ब्राह्मणाने लेन बद्दल, त्याच्या लिखाणाबद्दल किंवा त्याला सहकार्य करणाऱ्या भांडारकरी ब्राह्म्नांबद्दल एक अवाक्षरही काढले नाही. उलट नरेंद्र दाभोळकर आणि मेधा पाटकर यांच्यासारख्या तथाकथित पुरोगाम्यांनीही जेम्स लेनच्या विकृतीचे समर्थन करणाऱ्या लोकांना आपापल्या प्रसार माध्यमांचे विचारपीठ उपलब्ध करून दिले. सध्या महाराष्ट्रात ब.मो. पुरंदरे या देशी जेम्स लेनला फडणवीस सरकारने यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केलाय त्यावरून किती रणकंदन माजले आहे हे आपण पाहतोच आहोत. मला एक तरी भट ब्राह्मण दाखवा की जो पुरंदरेने  केलेल्या विकृतीचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेला आहे. रस्त्यावर उतरणे जाऊ द्या. किमान त्याचा साधा निषेध तरी कुण्या ब्राह्मणाने केलाय का? भिडे सारख्या विकृत मनुवादी किड्यापासून ते चाणक्य मंडळाचे सर्वेसर्वा असणाऱ्या अविनाश धर्माधिकारी यांच्या पर्यंत एकजात भट ब्राह्मण पुरंदरेचेच गुणगान गात आहेत. पुरंदरेच कसे श्रेष्ठ आहेत याचा कंठशोष करत आहेत. या धर्माधिकारी यांनी एक बाब ध्यानात घेतली पाहिजे की यांच्या चाणक्य मंडळात ९०% मुले ही बहुजनांची आहेत. त्यांच्या कडूनच फिसच्या स्वरुपात वसूल केलेल्या पैशावर हे धर्माधिकारी शिवरायांची व मॉं साहेबांची बदनामी करणाऱ्या पुरंदरेचे समर्थन करतो म्हणजे याचाच अर्थ ही जातीयतेची भावना या लोकांमध्ये किती घट्ट रुजली आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. काही ब्राह्मण महाभागांनी तर पुरंदरेंचा  उल्लेख पितृतुल्य, ऋषीतुल्य, गुरुवर्य असा केलेला आहे. म्हणून आपण सर्वांनी हे लक्षात घेतले पाहिजे की ही मंडळी एकजात आपल्या जातभाईंचे समर्थन करण्यात गुंतलेली असतात. मग ती व्यक्ती कितीही विकृत आणि गुन्हेगार असली तरीही.
  मग असे वागणे आपल्याला का बरे जमत नाही? माझा हा सवाल आहे.

सर्वात आश्चर्याचे आणि धक्कादायक उदाहरण मी तुम्हाला देतो. राजर्षि शाहू महाराजांच्या काळात वेदोक्त प्रकरण किती गाजले होते हे आपणास ठाऊक आहे. शाहू हे मराठे असल्यामुळे ते शुद्र आहेत म्हणून त्यांचे विधी वेदोक्त मंत्रांनी न करता पुराणोक्त मंत्रांनीच म्हणजे शुद्रांसाठी असणाऱ्या मंत्रांनीच करणार असे शाहू महाराजांनी पगार देऊन नोकरीवर ठेवलेल्या चपराश्याच्या पातळीच्या नारायण भटाने खुद्द राजर्षि शाहू महाराजांना सुनावले होते. आता हा भटुरडा स्नान संध्या करणारा कर्मठ ब्राह्मण असल्यामुळे त्याचे असे म्हणणे आपण एकवेळ समजून घेऊ हो. पण टिळक? हो तेच आपले तथाकथित लोकमान्य टिळक. ते तर त्यावेळी राष्ट्रीय पातळीवरचे नेते होते. शाहूंना आशा होती की किमान हे टिळक तरी आपल्या बाजूने उभे राहतील. पण काहीही झाले तरी ब्राह्मण हा शेवटी ब्राह्मणच असतो. तो पाहिल्यान्दाही ब्राह्मण असतो आणि शेवटीही ब्राह्मणच असतो. तो कधीच भारतीय, मराठी अथवा हिंदू असत नाही. शाहूंच्या अपेक्षेवर सपशेल पाणी फिरवत टिळक नावाच्या या राष्ट्रीय नेत्याने चक्क भुरट्या भटाची बाजू घेतली आणि शाहूंना क्षत्रिय मानायला नकार दिला. आपले केसरी नावाचे वर्तमानपत्र टिळकांनी तमाम भटांचे मुखपत्र बनवले. नारायण भटाच्यामागे टिळकांनी प्रचंड मोठी नैतिक ताकत उभी केली आणि काहीही केले तरी राजर्षि शाहूंचा पराभव करायचाच असा चंग बांधला. बरे टिळक ज्या भटाची बाजू घेत होते त्या भटाची नैतिक बाजूही तपासून पाहूयात. हा नारायण भट वेश्यांच्या संगतीमध्ये रात्र काढायचा. शाहू महाराजांचा ड्रायव्हर गाडी घेऊन याला वेश्येच्या घरून नदीवर आणायचा. पण हा बहाद्दर साधी आंघोळही करायचा नाही की तोंडही धुवायचा नाही. पारस्या अंगानेच राजर्षी शाहुंसाठी मंत्र म्हणायचा. याचे कारण विचारले असता अत्यंत उर्मटपणे तो म्हणाला की शाहू हे शुद्र आहेत आणि शुदाची पूजा करताना मला अंघोळीची गरज नाही. काय जातिवंत हरामखोरी आहे हो ही. किती पराकोटीचा निर्लज्जपणा आहे हा. तरीही असल्या चारित्र्यहीन भटासाठी टिळकाने आपली पूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली. का? कारण रामदासानेच सांगितलय ना की ब्राह्मण जरी झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ. याला म्हणतात जातीयवाद आणि याला म्हणतात एकी. या टिळकाने शाहूंना एवढा त्रास दिला होता की शेवटी शाहूंना म्हणावे लागले की “ हे टिळक जर परदेशात जन्मले असते तर मी यांना गोळी घालून ठार केले असते.”

    तत्कालीन ब्राह्मणाने एका अस्पृश्य जातीतील स्त्रीवर बलात्कार केला होता तेव्हा सुद्धा टिळक म्हणाला होता की “त्याने बलात्कार केला नसून त्या अस्पृश्य असणाऱ्या स्त्रीचा अस्पृश्यता उद्धार केला.” धन्य आहेत रे बाबा असले लोकमान्य आणि त्यांचे चेले.

    सांगण्याचे तात्पर्य काय की टिळकासारखा राष्ट्रीय पातळीवरचा ब्राह्मण एक चारित्र्यहीन भटाची बाजू घेतो, त्याला राजर्षि शाहुंपेक्षा जास्त महत्व देतो आणि आपण मात्र अत्यंत सामान्य कार्यकर्ते असतानाही एका राष्ट्रीय पातळीवरील आपल्याच नेत्याची बदनामी करतो? काय म्हणावे याला.  भावांनो ही व्यवस्था फार मजबूत आहे. आपल्याला यासाठी निरंतर, पिढ्यानपिढ्या लढा द्यावा लागणार आहे. सातत्याने समाज जागृती करावी लागणार आहे. तेव्हा आपल्याच लोकांवर अश्लाघ्य आरोप करून चळवळी संपवण्याचे काम करू नका. कुणाचे विचार पटत नसतील तर दुसऱ्या माध्यमातून आपल्या महामानवांच्या विचारांचा प्रचार प्रसार करा. तुम्हाला कुणी अडवलंय का? पण उगाच साप साप म्हणून जमीन बडवण्यात काही अर्थ आहे का? भटांकडून एवढा एक गुण (?)जरी आपण घेतला ना तरी मला वाटते आपला लढा बराच यशस्वी होईल.

-डॉ.बालाजी जाधव, औरंगाबाद.
(०५/०८/२०१५)

~~@@@~~


Monday 27 July 2015

राजमुद्रा प्रतिष्ठान पेठवडजचे ऐतिहासिक कार्य, २० ग्रामपंचायती मध्ये घेतला फडणवीस सरकारच्या निषेधाचा ठराव

फडणवीस सरकारने यंदाचा “महाष्ट्रभूषण पुरस्कार” वादग्रस्त कादंबरीकार व तथाकथित शिवशाहीर ब. मो. पुरंदरे यांना जाहीर केला. फडणवीस सरकारच्या या घाशिरामी निर्णयामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. कारण ब. मो. पुरंदरे यांनी त्यांच्या लिखाणातून, नाटकातून जागोजागी मांसाहेब जिजाऊ, राजे शहाजी, छ. शिवाजी महाराज आणि मराठा-कुणबी समाज यांची बदनामी केलेली आहे. एवढेच नाही तर जेम्स लेन प्रकरणातही पुरंदरे यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. जेम्स लेन याने राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल जे वादग्रस्त लेखन केले होते त्याला  “असे काही लेखक म्हणतात” अशी पुस्ती जोडली होती. पुरंदरे यांनी ज्या प्रकारे लेखन केलेले आहे ते वाचून लेनच्या पुस्तकातील काही लेखक हे दुसरे तिसरे कुणी नसून ब.मो. पुरंदरेच आहेत हे कोणत्याही जाणकार व्यक्तीच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. आपल्या लेखनाला कसलाही आधार नसताना पुरंदरे यांनी कपोलकल्पित लेखन केलेले आहे. शिवजयंतीचा तारीख व तिथी याचा वाद निर्माण करण्यात पुरंदरेच अग्रभागी होते. त्यांच्या या कारवायामुळे कोल्हापूर येथे त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा एक कोटीचा दावाही गुदरण्यात आलेला आहे. म्हणून राजमुद्रा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री संगम लांडगे यांनी ५ जुलै २०१५ रोजी पेठवडज येथे शिवसन्मान जागर परिषद आयोजित केली होती. या परिषदेला औरंगाबाद येथील प्रसिद्ध लेखक, वक्ते तथा प्रकाशक डॉ.बालाजी जाधव यांनी संबोधित केले होते. डॉ. जाधव यांनी या परिषदेत पुरंदरे यांच्या विकृत लिखाणाची पोलखोल केल्यामुळे राजमुद्राच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन त्या त्या ग्रामपंचायतीचे ठराव मंजूर करून घेतले. त्यांच्या या उपक्रमाला प्रतिसाद देत आत्ता पर्यंत सुमारे २० गावातील लोकांनी ब. मो. पुरंदरे यांचा महाराष्ट्र भूषण फडणवीस सरकारने रद्द करावा असा ठराव केलेला आहे. महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात फडणवीस सरकारच्या निषेधाचे ठराव मंजूर करून घेणारे कार्य करणारे राजमुद्रा प्रतिष्ठान हे बहुधा पहिलेच असावे. त्यांच्या या कार्यामुळे समाजातल्या सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
ब.मो.पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येऊ नये म्हणून नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील खालील गावांनी निषेधाचे ठराव मंजूर केलेले आहेत.
१. आलेगाव  २. बाळंतवाडी  ३. बारूळ ४. बोरी ५. देवईची वाडी  ६. घागरदरा  ७. हनमंतवाडी ८.कल्हाळी ९. कळका १०. खंडगाव  ११. लालवाडी १२. मादाळी १३. मंगलसांगवी  १४. मंगनाळी १५. नंदनशिवणी १६. रामानाईक तांडा १७. संगुचीवाडी १८. सावरगाव (नि)  १९. सावळेश्वर. २०. पेठवडज.  

हे ऐतिहासिक कार्य करणारे राजमुद्रा प्रतिष्ठान पेठवडजचे शिलेदार पुढीलप्रमाणे :

संगम लांडगे, नीलकंठ मुगावे, गजानन जाधव, भास्कर कंधारे, खुशाल राजे, पांडुरंग कंधारे, रामदास डावकोरे, चंद्रकांत कारभारी, नामदेव कदम, प्रसाद तेलंग, सचिन इंगोले, केशव गजेवाड, भानुदास नुकुलवाड ई.                
बांधवांनो आपल्या या सच्च्या शिवमावळ्यांचे फोन करून अभिनंदन करा आणि त्यांना प्रोत्साहन द्या :
संगम लांडगे (९४२२६९३९६०) गजानन जाधव (९४२१५५१०४३) भास्कर कंधारे (९७६६८६२८७७) खुशाल राजे (९०११४४८७७७)

-डॉ.बालाजी जाधव.
मो-९४२२५२८२९०

Tuesday 21 July 2015

तुका म्हणे जरी गळे अहंकार, तरी वसे घर नारायण

वचन ते नाही तोडत शरीर Iभेदत अंतरा वज्रा ऐसे II 1 II
काही न सहावे काशाही कारणे I संधेह नीधान देह बळी II 2 II
नाही शब्द मुखी लागत तिखट I नाही जड होत पोट त्याने II 3 II
तुका म्हणे जरी गळे अहंकार  Iतरी वसे घर नारायण II 4 II

           संत तुकारामांनी अभंगाच्या माध्यमातून जीवनातील विविध अंगांना, विविध क्षेत्रांना स्पर्श केले आहे. मागच्या अभंगात आपण एखाद्याशी वाद कसा घालावा आणि त्याला गोडीला कसे आणावे हे पहिले होते. या अभंगात तुकारामांनी वाईट-साईट, विचार-पाचार न करता कसेही मनावर ओरखडे उमटवत बोलण्याने काय होते हे अत्यंत मार्मिक शब्दांत सांगितले आहे. तसे पाहायला गेले तर तुकोबांचा भर हा आयुष्यभर मानवाच्या मनाच्या शुद्धतेवरच राहिलेला आहे. मोह, माया, लोभ, मत्सर इ. तामोगुनांचा त्याग केला की ना लागे सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण अशी मानवाची अवस्था होऊन बसते आणि त्याला मग लौकिक पूजा करण्याची गरजही भासत नाही. म्हणून ते  म्हणतात- ‘करावी पूजा मनेची उत्तम, येथे लौकीकाचे काय काम?’ तेव्हा मनुष्याला वागण्या बोलण्यापासून ते कष्ट करण्यापर्यंत तुकोबांनी अभंगातून मार्गदर्शन केले आहे. आपल्या आजूबाजूला विशेषतः खेड्या मध्ये अगदी छोट्या छोट्या कारणावरून घरामध्ये किती कुरबुरी होतात हे तुकारामांनी प्रत्यक्ष पहिले होते. शेतीच्या बांधाच्या वादावरून सख्खे भाऊ एकमेकांचे मुडदे पडताना पाहून तुकोबांचे मन कासावीस झाले नसल्यास नवल. अशावेळी आपल्या विचार न करता बोलण्यामुळे कसा अनर्थ होतो हे अभंगातून सांगताना तुकोबा म्हणतात ‘वचन ते नाही शरीरा तोडत, अंतरा भेदत वज्रा ऐसे’ म्हणजे तसे पाहायला गेले तर एखाद्याने आपल्याला टोचून बोलले किंवा घालून पडून बोलले तर आपल्या शरीराला काही भोके पडत नाहीत, आपले शरीर काही तुटत नाही, भंगत नाही किंवा त्याच्यावर कसल्याही बाह्य जखमा होत नाहीत. परंतु आपले अंतर्मन जे आहे ते मात्र एखाद्या कठीणातल्या कठीण वज्राने भेदावे तसे भेदले जाते. त्याच्यावर ओरखडे उमटले जातात. त्याला तडे जातात. आपले अंतर्मन हे घायाळ होऊन जाते आणि आपण कासावीस होऊन जातो. असे मनावर वज्रासारखा आघात करणारी जी माणसे असतात हे कठीण वज्रासारखे आघात करणारे का बरे बोलत असतात? कारण त्यांच्या मनी अत्यंत अहंकार भरलेला असतो. ते काहीही झाले तरी त्यांच्या मनाविरुद्ध एकही गोष्ट सहन करू शकत नाहीत. इतरांच्या बाबतीत त्यांचा असलेला संशय, त्यांच्या मनी वसत असलेला संदेह ते मेल्याशिवाय जात नाही हे सांगताना तुकोबा म्हणतात- ‘काहीही न साहवे कशाही कारणे, संदेह निधान देह बळी.’ अशाप्रकारे केवळ मर्यादेपेक्षा जास्त अहंकार असल्यामुळे ही मंडळी आपल्या मनाविरुद्ध एकही गोष्ट सहन करून शकत नाहीत. त्यांच्या मनातला इतरांविषयी असलेला संदेह, संशय मेल्याशिवाय जात नाही एवढे हे लोक अहंकारी असतात. म्हणतात ना सुंभ जळाला तरी पिळ जात नाही म्हणून तशी या अहंकारी लोकांची अवस्था असते.
    तसे पाहायला गेले तर अशा कठोर शब्दाने, मनाला आरपार भेदून काढणाऱ्या शब्दांनी खरे तर बोलणाऱ्याचे तोंड भाजून निघत नाही, असे शब्द काही आपल्या जिभेला मिरची सारखे तिखट लागत नाहीत किंवा असे शब्द, वचन बोलल्याने आपले काही पोटही जड होत नाही. परंतु समोरच्या व्यक्तीच्या अंतर्मनाला झालेल्या जखमा कशा भरून काढायच्या? ‘नाही शब्द मुखी लागत तिखट, नाही होत जड पोट त्याने.’ शब्दांच्या होणाऱ्या परिणामांची जाणीवच नसल्यामुळे अशी व्यक्ती काहीच्या बाही बोलत असते. म्हणून तुकोबाराय म्हणतात ‘तुका म्हणे जरि गळे अहंकार, तरी वसे घर नारायण.’ म्हणजे अशा कठीण वज्रासारखे बोलायला कारणीभूत ठरणाऱ्या अहंकाराला जरी आपण आपल्यातून काढून फेकले, त्याच्या पासून आपली सुटका करून घेतली, आपल्यातील अहंकाराचे उच्चाटन केले, त्याला समूळ नष्ट केले तर आपल्याला असे शब्द उच्चारण्याची वेळच येणार नाही आणि आपल्या पोटी अहंकारच उरलेला नसल्यामुळे आपल्या मनात कुणाबद्दल कसलाच संदेह, कोणताच संशय उरणार नाही आणि पर्यायाने आपण कठीण वज्रासारखे कटू वचन, कटू शब्द वापरणे बंद करून टाकू. म्हणून ज्या घरात अहंकार गळून गेलेली माणसे वावरतात त्या घरात खऱ्या अर्थाने सुख, शांती आणि समृद्धी तर असतेच पण खऱ्या अर्थाने अशा घरातच नारायणाचा म्हणजे साक्षात पांडुरंगाचा वास असतो.
     अशाप्रकारे आपले बीजच जर का शुद्ध झाले तर मग या बीजापोटी येणारी फळे सुद्धा रसाळ आणि गोमटी असतात हे त्यांनी त्यांच्या एका वेगळ्या अभंगात स्पष्ट केलेले आहे.
शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी
मुखी अमृताची वाणी देह वेचावा कारणी
सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ
तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती


  -डॉ.बालाजी जाधव, औरंगाबाद.
(१६/०७/२०१५)



~~@@@~~

Monday 20 July 2015

शिवाजी क्लब ते टिळक रस्ता

पुरोगामी विचारधारा आणि तिचा प्रचार प्रसार करणाऱ्या प्रशिक्षित कार्यकर्त्यांना संपवणे हे इथल्या एका विशिष्ट कंपूतील लोकांचे जीवितकार्य होऊन बसलेले आहे असे इतिहासाची पणे चाळली असता आणि सध्याच्या काही घडामोडी पहिल्या की सहजपणे लक्षात येते. प्रथमतः अशा चळवळीकडे ही मंडळी दुर्लक्ष करतात, त्यांना अनुल्लेखाने मारतात. एवढे करूनही पुरोगामी विचारांचे प्राबल्य समाजात वाढतच असेल आणि त्यामुळे सनातनी विकृत विचारांचे सत्य बाहेर येत असेल तर मग अशा लोकांना ‘कुजबुज तंत्राद्वारे’ (whispering campeign) बदनाम करणे सुरु होते. अशी बदनामी करत असताना कसलेही ताळतंत्र न ठेवता अथवा तर्कबुद्धीचा वापर न करता कसलेही बेछूट आरोप करणे हे या लोकांचे तिसरे कार्य असते. उदाहरणादाखल संभाजी ब्रिगेडला ही मंडळी हे लोक तालिबानी आहेत, गुंड आहेत, ज्ञानसंस्कृतीचे विरोधक आहेत, अडाणचोट आहेत इ. इ. असे म्हणतात. अशा अफवांनीही काम होत नसेल तर मग हे लोक जातीयवादी आहेत, धर्मद्रोही आहेत, धर्मबुडवे आहेत, यांना आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांकडून पैसा मिळतो अशा प्रकारची बुद्धीशी फारकत घेऊन वक्तव्ये केली जातात. एका मनोविकृत महाभागाने तर दूरचित्रवाणी वरील जाहीर चर्चेत संभाजी ब्रिगेड या पुरोगामी संघटनेचे सिमी या बंदी घातलेल्या संघटनेशी संबंध असल्याचे सांगताना उभ्या महाराष्ट्राने पहिले व ऐकले आहे. एवढे सायास करूनही पुरोगामी विचारांचे कार्य वाढतच राहिले तर मग याच चळवळीशी या ना त्या कारणाने संबंधित असणाऱ्या तथाकथित पुरोगाम्यांना आपल्या जाळ्यात ओढले जाते आणि त्यांच्याकडून अशा चळवळी याच खऱ्या फ्यासीस्ट असून सनातनी विचारधारेची मंडळीच कशी या देशात समता प्रस्थापित करून शकतात असे लिखाण करून घेतले जाते. अर्थात अशा वेळी बहुजन समाज थोडासा विचलित होतो खरा परंतु वेळ गेली आणि वादाचा धुरळा खाली बसला की या बेगडी पुरोगाम्यांनी पांघरलेला बेगडी बुरखा टराटरा फाडला जातो आणि समाजाच्या दृष्टीस पडते तो त्यांचा सनातनी गटारघाणीत बुचकळून काढलेला सनातनी चेहरा. तेव्हा समाज परत नव्या जोमाने कामाला लागतो. बाबा पुरंदरे हे इतिहासकार नाहीत म्हणणारे एक ‘हरीचे लाल’ नाही का टी.व्ही. वर पुरंदरे हेच कसे खरे इतिहासकार आहेत असे सांगत होते ते.
     तेव्हा हे सनातनी त्या त्या चळवलींचे नेतृत्वाला विकत घेण्याचा किंवा त्याला हायज्याक प्रयत्न करतात. अर्थात असे घडणे सहज शक्य नसतेच. मग हे लोक आपल्या मूळ प्रवृत्तीवर येतात आणि पुरोगामी विचारांचे कार्य करणाऱ्या लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्याच्या हेतूने ही मंडळी  घातपाती कृत्य करण्याचे डाव आखू लागतात. सनातन्यांची ही कार्यपद्धती बळीराजापासून ते काल परवाच्या गोविंद पानसरे यांच्या पर्यंत चालूच आहे. जिजाई प्रकाशनाच्या कार्यालयात शनिवारी ११ जुलै २०१५ रोजी आलेली स्फोटकेही सनातन्यांच्या याच कार्यपद्धतीचे द्योतक आहे. स्फोटकांच्या या पार्सलमध्ये अल्युमिनिअमचा एक रॉड, स्फोटकसदृश्य पदार्थ, आणि धमकीच्या मजकुराबरोबरच काही बातम्यांची कात्रणे आढळली. ही कात्रणे मा.आ.जितेंद्र आव्हाड, श्रीमंत कोकाटे आणि निखील वागळे यांच्याशी संबंधित आहेत. या तीनही कात्रणात या तिघांच्याही नावावर लाल शाईने फुल्या मारलेल्या आढळून आलेल्या आहेत. प्रस्तुत बातम्यांची कात्रणे हे क्षात्रतेज नावाच्या वृत्तपत्रातील असल्याचे दिसत आहे. स्फोटकांचे हे पार्सल टिळक रस्त्यावरील स.प. महाविद्यालया जवळील टपाल कार्यालयातून पाठवण्यात आलेले आहे. परंतु ते कुणी पाठवले याबाबत मात्र अजून कसलीही माहिती समोर आलेली नाही.   
      सनातन्यांची ही कार्यपद्धती कसकशी बदलत जाते हे पाहण्यासाठी आपण राजर्षि शाहूंचे उदाहरण घेऊ या. १८९३-९४च्या दरम्यान कोल्हापुरात भारताला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी क्रांतीकारकांची एक गुप्त संघटना सुरु करण्यात आली. या संघटनेचे नाव ‘शिवाजी क्लब’ हे होय. या ‘शिवाजी क्लबचे’ प्रमुख उद्दिष्ट इंग्रजांची सत्ता उलथवून टाकून त्या जागी शिवछत्रपतींचे वारस असणाऱ्या शाहू छत्रपतींचे एकछत्री राज्य निर्माण करणे हे होते. त्यामुळे या क्लबला शाहू छत्रपतींची मदत असणे स्वाभाविक होते. क्लबच्या आरंभीच्या उद्दिष्टाकडे पाहून या क्लबात शाहू महाराजांचे धाकटे बंधू बापूसाहेब महाराज यांच्या पासून ते शाहू महाराजांच्या दरबारातील महत्वाचे अधिकारी जायचे. या ‘शिवाजी क्लबला’ बाळ गंगाधर टिळकांचा वरदहस्त लाभलेला होता. प्रारंभी मर्दानी खेळाचे शिक्षण देणे, गणेश उत्सव साजरा करणे, फुलेंनी सुरु केलेली शिवजयंती पुढे सुरु ठेवणे अशा प्रकारचे विविध उपक्रम या क्लबात केले जायचे. परंतु पुढे पुढे या मंडळींनी शाहूं महाराजांच्या विरोधातच कारवाया सुरु केल्या. अर्थात असे करण्यामागे राजर्षि शाहूंचे परिवर्तनवादी कार्य होते हे सांगण्याची आवशक्यता नाही. पुढे जगप्रसिद्ध असे वेदोक्त प्रकरण घडले. हे प्रकरण पेटवणारी बहुतांश मंडळी ही या ‘शिवाजी क्लबचे’ सभासद होती. म्हणून वेदोक्त प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहूंनी राजाज्ञा काढून दरबारातील मंडळींना अथवा त्यांच्या नातलगांना ‘शिवाजी क्लबशी’ कोणत्याही प्रकारचा संबंध ठेऊ नये असे सांगितले. त्यामुळे बहुतांश ब्राह्मणेत्तर-बहुजन समाजातील सभासदांनी या क्लबातून आपले अंग काढून घेतले. “परिणामी वेदोक्ताच्या पार्श्वभूमीवर शिवाजी क्लब हा मुख्यतः ब्राह्मण दहशतवाद्यांचा गट म्हणून पुढे आला.” (राजर्षी शाहू छत्रपती-जीवन व कार्य, ले. जयसिंगराव पवार)
        नारायण राजोपाध्ये या शाहू महाराजांचा नोकर असणाऱ्या ब्राह्मणाने महाराजांना क्षत्रिय मानण्यास नकार देऊन तुम्ही शूद्रच आहात असे ठणकावून सांगितले आणि म्हणून तुम्हाला जर मी पूजा अर्चा करावी वाटत असेल तर ती मी तुम्हाला शूद्र मानूनच करेन परंतू तुम्हाला मी कदापि क्षत्रिय मानणार नाही असे अत्यंत मग्रुरीने सांगितले. त्यावेळी महात्मा फुलेंनी जामीन घेऊन बाळ गंगाधर टिळकांचा जाहीर सत्कार केल्यामुळे टिळकांना समाजमान्यता मिळालेली होती. शाहू महाराजांना अपेक्षा होती की वेदोक्त प्रकरणात टिळक  आपल्याला पाठींबा देतील. परंतु राजर्षींची घोर निराशा झाली. टिळकांनी शाहूंना पाठींबा न देता तत्कालीन ब्राह्मणा वर्गाच्या पाठीशी राहणे पसंत केले. नव्हे वेदोक्त प्रकरणात टिळकांनी त्यांचा केसरी पेपर ब्राह्मणांचे मुखपत्र बनवले आणि शाहूंना स्वतःला क्षत्रिय मानण्याचे खूळ म्हणजे वेड लागले आहे अशी जहरी टीका केसरीच्या माध्यमातून सुरु केली. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे बाळ गंगाधर टिळकांसारख्या राष्ट्रीय समजल्या जाणाऱ्या  नेत्याने त्यावेळी छत्रपतींची बाजू घेतली नाही तर त्यांनी आपली सगळी ताकत छत्रपतींच्या घरातील एक नोकर असणाऱ्या आपल्या जातभाईसाठी खर्ची घातली. त्याच्यासाठी आपली सगळी संसाधने उपलब्ध करून दिली. यावरून बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेल्या सिद्धतांची सत्यता पटल्याशिवाय राहत नाही. बाबासाहेब म्हणाले होते की “पुरोगामी ब्राह्मण आणि प्रतिगामी ब्राह्मण हे एकाच शरीराच्या दोन भुजा आहेत. आणि एकाच्या अस्तित्वासाठी दुसरा लढल्याशिवाय राहणार नाही.” त्यातल्या त्यात टिळकांचे जीवनकार्य पाहता टिळक हे कोणत्याही अंगाने  पुरोगामी गटात बसत नव्हते. तेव्हा त्यांनी सनातन्यांची बाजू घेणे यात काहीही आश्चर्य नाही. जेम्स लेन प्रकरण असो, गोविंद पानसरेंची  हत्या असो की काल परवा ब्रिगेडच्या कार्यालयात पाठवेले स्फोटक प्रकरण असो अशावेळी स्वतःला पुरोगामी समजणारे, सगळेच ब्राह्मण वाईट नसतात काही चांगलेही असतात असे सांगून स्वतःला चांगले ब्राह्मण म्हणून घेणारे, गरीब, सज्जन, ज्ञासंस्कृतीचे पाईक, विचारांचा मुकाबला विचारांनी करावा असा शहजोगपणाचा सल्ला देणारे ब्राह्मण कोणत्या बिळात तोंड खुपसून बसतात हे मात्र आपल्याला समाजात नाही. अर्थात ‘मौन संमतीदर्शनम’ हे संस्कृत वचनच असल्यामुळे बाबासाहेबांचा सिद्धांत आपल्याला मनोमन पटल्याशिवाय राहत नाही.
       शिवाजी क्लबला नंतर नंतर ब्राह्मण दहशतवाद्यांचे केंद्र असे स्वरूप आले. वेदोक्ताच्या वणव्याबरोबर कोल्हापुरातील ब्राह्मण दहशतवाद्यांच्या कारवायाही वाढतच गेल्या. एवढ्या की ‘शिवाजी क्लब’ स्थापन करतानाचे त्यांचे जे उद्दिष्ट होते ते बाजूला पडले व काहीही करून राजर्षि शाहूंचा बंदोबस्त करायचा नव्हे  वेळ प्रसंगी त्यांचा काटाही काढायचा हेच त्यांचे अंतिम धेय्य होऊन बसले. म्हणून या मंडळींनी सशस्त्र क्रांती करण्यासाठीची जी शस्त्रे होती त्या शस्त्रांचा वापर खुद्द शाहू महाराजांचा घातपात करण्यासाठी सुरु केला. म्हणजे शिवरायांचेच नाव घ्यायचे आणि त्यांच्याच वारसाला संपवण्याचा प्रयत्न करायचा ही नीती सुद्धा पुरातन काळापासून वापरली जाते. तेव्हा शिवरायांच्या नावाचा कुणी जयघोष करत असेल तर डोळे बंद करून अशांच्या पाठीमागे पळणे अवसानघातकी ठरू शकते हे बहुजन समाजातील लोकांनी समजून घ्यायला हवे. वेदोक्त प्रकरणात इंग्रजांकडे दाद मागूनही सगळीकडे सपाटून मार खाल्ल्यामुळे ब्राह्मण प्रचंड संतापले होते. म्हणून इ. स. १९०६ मध्ये या मंडळींनी खोट्या नावाने मुंबई सरकारकडे अर्ज पाठवून महाराजांचे चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला. (विशेष सूचना: खोटे नाटे नाव धारण करून बहुजन समाजाच्या प्रेरणास्थानांना बदनाम करण्याचे ब्राह्मणी कारस्थान हे आजच्या काळातही चालूच आहे. फेसबुक, व्हाटस अप वर खोटे नाव धारण करून बहुजन महामानवांना बदनाम करण्याचे काम आजही किती जोमाने चालू आहे हे आपण पाहतच आहोत. तेव्हा काळ बदलला, काळानुसार शस्त्रे बदलली परंतु लढाई अजूनही तीच आहे हे बहुजनांनी समजून घ्यावे.) म्हणजे ज्यांना या देशातून इंग्रजांना हाकलून द्यायचे होते त्यांनीच इंग्रजांचे तळवे चाटून शाहूंचा बंदोबस्त करण्याचे काम सुरु केले. परंतु असल्या खोट्या नाट्या पत्रांचा इंग्रजांवर काहीही परिणाम झाला नाही. तेव्हा २१ मार्च १९०८ रोजी महाराजांची कन्या अक्कासाहेब महाराज यांच्या विवाह समारंभात बॉम्ब टाकण्याची योजना या ब्राह्मण दहशतवाद्यांनी आखली. परंतु पुण्याहून येणारा बॉम्ब कोल्हापुरात वेळेत पोहोचू शकला नाही म्हणून पुढचा अनर्थ टळला. या सगळ्या घातपाती कारवायांमागे दामू जोशी, गणपतराव मोडक या ब्राह्मण दहशवाद्यांचा हात होता.
        हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे जिजाई प्रकाशनाकडे जे स्फोटकांचे पार्सल आलेले आहे त्यावर टिळक रस्त्यावरील स.प. महाविद्यालयाजवळील टपाल कार्यालयाचा शिक्का असल्याचे वर्तमानपत्रात वाचण्यात आले. शिवाजी क्लब वर पण टिळकांचा वरदहस्त असल्याचे आपण पहिलेच आहे. तेव्हा या खोडसाळपणा मागेही टिळकांच्या वैचारिक वारसांचा हात आहे की अजून कुणाचा हे शोधण्याचे काम मात्र पोलिसांचे आहे.
(दि. १६.०७.२०१५)
डॉ.बालाजी जाधव, औरंगाबाद.

मो.९४ २२ ५२ ८२ ९०.

Tuesday 23 June 2015

बाबासाहेब पुरंदरे की शिर्के?


    सध्या महाराष्ट्राचे राजकीय तसेच सामाजिक वातावरण तापलेले आहे. अर्थातच एका राजकीय निर्णायामुळे हे वातावरण तापलेले आहे. फडणवीस सरकारने या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार तथाकथित शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर केला आहे. गेल्या ३ वर्षांपासून हा पुरस्कार धूळ खात पडला होता. परंतु त्यावरील धूळ दूर करण्याचे परमपुण्याचे काम या मायबाप फडणवीस सरकारने केले आहे. परंतु ही  धूळ करत असताना फडणवीसांनी आपला कुटील नाना फडणवीसी मेंदू वापरून आपले आडनाव सार्थ करत महाराष्ट्राच्या मातीत नवीनच धुरळा उडवून दिलेला आहे. पुरंदरे यांचे खरे रूप जेम्स लेन प्रकरणातील त्यांचा थेट सहभाग, इतिहासाची मूळ साधने तसेच ऐतिहासिक वस्तू गहाळ करणे, मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपिंसोबत त्यांचे असलेले संबंध इ.  कारनामे एव्हाना महाराष्ट्रातील शेंबड्या पोरालाही माहित झालेले आहेत. तेव्हा पुरंदरे यांची खरी जागा ही तुरुंगांच्या चार भिंतीत असताना त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार कसा काय? असा प्रश्न सामान्य माणसाला पडल्यावाचून राहिला नाही. पुरंदरे यांना हा पुरस्कार देण्यामागे त्यांनी केलेले शिवकार्य नसून त्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले रक्ताचे नातेच कारणीभूत आहे हे सांगायला आता काही भाजप सरकार मधील बोगस डिग्री धारक ज्योतिषांची गरज उरलेली नाही.

     परंतु या पुरस्काराच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या रस्तोरस्ती आणि गल्लोगल्ली मात्र एका वेगळ्याच चर्चेला उधाण आलेले आहे ते म्हणजे बाबासाहेब पुरंदरे हे पुरंदरे नसून शिर्के आहेत. पुरंदरे यांच्या शिर्के असण्याबाबत महाराष्ट्रातील लोक वेगवेगळे विनोद ऐकवत आहेत. लोक म्हणत आहेत की पुरंदरे यांचे बालपण हे पुण्यातल्या ३०७ शुक्रवार पेठेतील राजेशिर्के यांच्या वाड्यात गेलेले आहे. पुरंदरेंच्या बालपणी अर्थातच त्यांचे आई वडील तरुण अवस्थेत होते. तिथे पुरंदरे कुटुंबाला शिर्केंच्या घराण्यातील कुण्यातरी जाणत्या पुरुषाचा चांगलाच “सहवास” आणि “हातभार” लाभला असल्याचे महाराष्ट्राच्या रस्त्यावर मोठ्या चवीने बोलले जात आहे. पुरंदरेवरील संस्कार, अवघ्या १६व्या वर्षांपासून शिवछत्रपतींची सेवा, घरात जगदंबा आणि संत तुकारामांचा असलेला भला मोठा फोटो असले रांगडे मराठमोळे संस्कार बाबासाहेबांना पुरंदरेपेक्षा शिर्के यांच्याकडून वारसा हक्काने मिळाले असावेत असे सांगितले जात आहे. शिर्केंच्या स्वभावातील करडी शिस्त आणि साखरमाया हे गुण बाबासाहेब पुरंदरे यांच्यामध्ये जशास तसे उतरले आहेत. बालपणी पुरंदरे यांच्यावर खुद्द त्यांच्या वडिलांचाही जीव नसेल एवढा जीव शिर्केंचा होता. नव्हे शिर्के आणि पुरंदरे यांचे गोत्र एकच होते ते म्हणजे शिवभक्ती, जगदंबा भक्ती आणि तुकाराम भक्ती. अशा प्रकारच्या चर्चा राज्यभर रंगत असल्याचे चित्र आहे. विशेष बाब म्हणजे शिर्के यांच्या वाड्यात आपले बालपण गेल्याचा खुलासा दस्तुरखुद्द बाबासाहेब पुरंदरे यांनीच केला आहे. अधिक माहितीसाठी जिज्ञासूंनी २० फेब्रुवारी २०१२ च्या लोकसत्तेतील संस्कृती आणि संस्कार पान क्र १ वाचावे.

     खरी गोम काय असेल ते बाबासाहेब पुरंदरे आणि त्यांचे आई वडीलच जाणोत. परंतु मराठा कुणबी समाजातील स्त्रियांबद्दल बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या “राजा शिवछत्रपती” या कादंबरीत केलेला अवमान पाहता आपल्या बालपणातील काही अवमानजनक गोष्टींचा बदला घेण्यासाठीच पुरंदरे यांनी असे लेखन केलेले असावे असे बोलले जात आहे. मराठा पुरुष आणि स्त्रियांबद्दल पुरंदरे यांच्या मनात एवढा पराकोटीचा द्वेष असण्याचे कारणही पुरंदरे यांच्या बालपणातच दडले असल्याची चर्चा लोक मोठ्या चवीने करत आहेत. बालपणीच्या ‘काही कटू आठवणी’ तारुण्यात स्वस्थ बसू देत नसल्यानेच मनात निर्माण झालेल्या न्यूनगंडातून पुरंदरे यांनी ‘बदल्याच्या’ भावनेतून मराठा-कुणबी स्त्रियांची मनसोक्त बदनामी केली असावी असा अंदाज महाराष्ट्रातील जनता वर्तवित आहे. पुरन्दरेंच्याच लोकसत्तेतील खुलाशाचा आधार घेऊन सध्या राज्यामध्ये NAUGHTY JOKES चे पिक आलेले आहे. एवढेच नव्हे तर पुरंदरे यांचे BIOLOGICAL FATHER कोण असावेत यावरून तर्क वितर्कांना उधान आलेले आहे. महाराष्ट्रातील काही लोकांची अभिरुची कोणत्या पातळीला जाऊन पोचली आहे आहे याचेच हे निदर्शक मानायला हवे. असल्या घाणेरड्या प्रकारामुळे शिर्के घराण्याचीही बदनामी होत आहे याची साधी जाणीव सुद्धा या लोकांना नाही. एक व्यक्ती या नात्याने मी असल्या हीन अभिरुचीचा निषेध करतो.


     अर्थात लोकांच्या तोंडाला कोण आवरणार म्हणा? तसेही नदीचे मूळ आणि ऋषीचे कुळ शोधू नये म्हणतात. आम्हालाही पुरंदरे यांच्या मुळाचा आणि कुळाचा शोध घेण्यात काडीचाही रस नाही. परंतु मराठा-कुणबी स्त्रियांबद्दल पुरंदरे यांच्या मनात खरेच यांच्या मनात एवढा आकस का? असा प्रश्न मात्र सदसदविवेकबुद्धी असणाऱ्या कुणाही व्यक्तीला पडणे साहजिक आहे. याचे उत्तरही बाबासाहेब पुरंदरे आणि त्यांचे आई वडील यांनाच ठाऊक.   

डॉ.बालाजी जाधव,औरंगाबाद.
मो. 9422528290